Posts

मंगरुळ तें वॉशिंग्टन

मंगरुळ तें वॉशिंग्टन ‘देऊळ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात एक धमाल पात्र आहे. मंगरुळ नावाच्या विकासापासून कोसो दूर असलेल्या एका खेडेगावात, एक महिला सरपंच (आतिशा नाईक) असते. पण तिच्या सरपंचपदाआडून गावातला मातब्बर असामी असलेला भाऊ (नाना पाटेकर) आणि त्यांचा पुतण्या (श्रीकांत यादव) यांच्यातलेच कुरघोडीचे राजकारण चालू असते. तिच्या सासूच्या (उषा नाडकर्णी) लेखीसुद्धा तिच्या सरपंच असण्याची किंमत शून्य असते. एखाद्या अडचणीच्या वेळी सरपंच बाई कामाला निघाल्या, की सासूबाई ‘नुसतं फराफरा अन टराटरा’ म्हणत तिला उद्देशून टोमणे मारत असते. हे उद्योग करण्यापेक्षा कुठे वाळवणाला गेलीस तर चार पापड मिळतील, नुसती शायनिंग काय कामाची, हीच काय ती तिच्या सासूची माफक अपेक्षा! मंगरूळ गावच्या कथेचा हा ट्रॅक पुढे दत्त मंदिराच्या उभारणीकडे जातो. पण जाताना हसवता हसवता आपल्याला अंतर्मुख करून जातो, कारण गावपातळीवरचा हा राजकारणी महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण स्वतः कुठे ना कुठेतरी अनुभवलेला असतोच. केवळ कथेतील मंगरूळच नव्हे तर जगाच्या पाठीवर याविषयी काय वेगळे चित्र दिसत आहे? आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदा...

2020

Image
२००८ साली IPL चा पहिला सिझन झाला आणि भारतात एका नव्या युगाची नांदी झाली होती. खेळाच्या जुन्या सर्व संकल्पना, रूढी, गेमप्लॅन, रीतिरिवाज, संघभावना मोडीत काढत क्रिकेटविश्वात एका नव्या युगाचा आरंभ झाला होता. हे युग होत २०-२० क्रिकेटच !!  अनेक आजी-माजी खेळाडूंनी ह्यावर टीकेची झोड उडवली. क्रिकेटचा सत्यानाश होईल ही भविष्यवाणी वर्तवली गेली. पैशांची उधळपट्टी, चियरगर्ल्स संस्कृती, सामन्यानंतरच्या पार्ट्या, ग्लॅडीएटरसारखे लिलाव करून घेतले जाणारे खेळाडू हे सर्व नविन होत.  हे २०-२० युग काय दाखवणार होत ह्याची झलक पहिल्याच सिझनला दिसली. द्रविड, कुंबळेचा बेंगलोर संघ T20 च्या वेशातील कसोटी संघ म्हणुन हिणवला गेला,  सचिन, सौरवचे प्रबळ दावेदार संघ तळाशी राहिले, राजस्थान रॉयलसारखा अनपेक्षित संघ बाजी मारून गेला, स्वप्नील असनोडकर, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा वैगेरे हिरो मानले गेले. त्या त्या देशाचे खेळाडू इथे पैसे जास्त मिळतात म्हणून स्वतःच्या देशातील क्रिकेट सोडून इथे खेळू लागल्याने "क्लब मोठा की देश?" अशा चर्चा रंगू लागल्या.  केवळ देशच काय पण IPL च्या एका संघाशी एकनिष्ठ राहणेही अवघड होऊ लाग...

शाळा

'कुसुमाग्रज' म्हणजे निर्विवाद भाषाप्रभु ! त्यांच्या ओजस्वी लेखणीतून कित्येक कविता लिहिल्या गेल्या. अवीट गीते रचली गेली. तशीच आमच्या शाळेची प्रार्थना पण त्यांनीच लिहिली होती. आमची प्राथमिक शाळा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शाळांपैकी एक होती. आजही शाळेचे ते विस्तीर्ण पटांगण आठवते. त्या प्रार्थनेला चाल कोणी दिली होती माहीत नाही पण खूप सुमधुर संगीत होत. एकेक कडव 'शाळा' आणि 'शिक्षणा'प्रति भक्तिभाव जागृत करेल असं होतं. शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांच्या रांगा एकासुरात हात जोडून प्रार्थना म्हणायचा हे खुप सुंदर दृश्य होत. आज शाळेची ती जुनी वास्तू जमीनदोस्त झाली आहे. शाळा नवीन जागी स्थलांतरित झाली आहे. प्रार्थना अद्याप तीच आहे की नाही माहीत नाही. डॉन बॉस्को, झेव्हीयर, न्यू एरा, फ्रावशी अशा नावांच्या गदारोळात ती प्रार्थना कुठेतरी हरवून गेली आहे. 'शाळेच स्टेट्स' डाऊन होऊ नये म्हणून पालकांकडे 4 व्हीलर असेल तरच प्रवेश द्यायचा, असे निकष असलेल्या काही नवीन शाळा निघाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा नाही म्हटलं तरी अखेरचा श्वास घेत आहेत. काही कॉन्व्हेंट शाळा मुल...

MPSC 2

हवालदार पदाच्या ११३७ जागांसाठी २ लाख अर्ज ही बातमी वाचली. किती जणांनी गांभिर्याने अर्ज भरले सांगता येणार नाही पण यापैकी ४२३ (अभियंते) इंजिनियर होते. यामध्ये बेरोजगारीसाठी सरकारला दोष देऊन उपयोग नाही. मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला त्यावेळेस म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला नाशिकसारख्या शहरात फक्त २-३ इंजिनियरिंग कॉलेजेस होते. व थोडेफार तेवढेच तंत्रनिकेतन होते. पण गेल्या एक दीड दशकात दरवर्षी १-२ कॉलेजच्या वेगात वाढ होत आहेत. एक कॉलेज वाढणे म्हणजे त्या विद्याशाखेतील जवळपास ६० (Intake लक्षात घेता), स्पर्धक वाढतात. एवढ्या प्रमाणात इंजिनियर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतील तर त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या पण त्या प्रमाणात वाढली पाहिजे. पण दुर्दैवाने त्याकाळात जेवढी कंपन्यांची संख्या होती, तेवढीच आजही आहे. आणखी किती दिवस BOSCH-MAHINDRA-HAL ह्यांच्याकडून रोजगाराची अपेक्षा बाळगणार?? नवीन कंपन्या आल्या तरी त्यांना तेवढा ग्राहकवर्ग मिळेल का?? ही आकडेवारी खूप भयावह आहे.

रामायण-महाभारत

कालचे 'रामायण आणि महाभारत' ह्यांचे एपिसोड म्हणजे आयुष्यभर ध्यानी ठेवावे असे, धडे होते. #महाभारत - हस्तिनापूरच्या विभाजनानंतर आपल्या वाटेला ओसाड, वैराण भूमी आली म्हणुन पांडवांनी खचून न जाता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तिथे नविन शहर वसवले. कृष्णाने त्यांना समजावले की आता हिच तुमची 'कर्मभूमी' आहे. इंग्रजीत एक Quote आहे, 'There is a great value in disaster, we can start all over again' लाक्षागृह आग आणि हस्तिनापूरच्या फाळणीतुन पांडवांनी हाच बोध घेतला असावा. आता सगळं संपलं ही भावना जेव्हा आयुष्यात येते, तेव्हाच कदाचित आपल्या हातुन आणखी चांगलं किंवा भव्य घडण्याची शक्यता असते. हा आशावाद खुप महत्वाचा आहे. पंजाबी, सिंधी, पारशी हे समाज सातत्याने व्यापार उदिमात पुढे राहिले आहेत. वाळवंटी भागातले 'अरब व मारवाडी' देखिल व्यापारात दीर्घकाळ पुढे आहेत ह्याचे कारणही तेच आहे. स्वतःच्या मातृभूमीत येणारी सुखलोलुप जीवनशैली मनुष्याला निर्धास्त करत असते. Survival instinct नावाची त्याची भावना कमी करत असते, त्यामुळे स्वतःच्या चौकटीबाहेर गेल्यावर त्याला जगणे दुष्कर होऊन जाते...

ताजमहल

Image
हिंदी सिनेमात दोन कलावंतांतील मतभेद, वाद-विवाद, शत्रुत्व ही नविन गोष्ट नाही. कधी 'व्ही.शांताराम-दादा कोंडके', कधी 'कुमार सानु-उदित नारायण,' कधी 'सलमान खान-विवेक ओबेरॉय'.... !! ह्यांच्या कथा मसाला लावुन सांगितल्या जातात. पण दोन गीतकारांमधील वैचारिक मतभेद त्यांच्या कलेतून कसे व्यक्त होतात ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे 'साहिर लुधियानवी' आणि 'शकील बदायुनी' ह्यांच्यातील ताजमहालावरील 'war of words'!! शकील बदायुनींचा जन्म उत्तरप्रदेशच्या एका धार्मिक कुटुंबात झाला होता. शायर म्हणून तिथे त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला होता. अलिगढ विद्यापीठात शिकत असतानाच उत्कृष्ट शायर म्हणुन त्यांनी प्रसिद्ध झाले होते. मुंबईत आल्यानंतर मुघल-ए-आझम, बैजु बावरा, दिदार, गंगा जमुना सारख्या सिनेमातून त्यांनी अनेक अजरामर गीते सिनेविश्वाला दिली. चौदहवी का चांद हो, हुस्नवाले तेरा जवाब नही, कही दीप जले...!! ह्या गीतांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले. दुसरीकडे साहिर लुधियानवी हे पंजाबच्या लुधियानाचे, मूळ नाव अब्दुल हायी..!! फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. वैयक्तिक ...

In Nolan we trust

Image
कॉलेजच्या दिवसात मित्रांची रूम म्हणजे आमच्यासाठी मिनी थिएटर होत ! ' शिंडलर्स लिस्ट' सारखा All time classic असो अथवा 'द अंग्रेज' सारखा छपरी हैद्राबादी सिनेमा, आमच्या रसिकतेला कशाचेही वावडं नव्हतं ! कधी कधी लॅपटॉपवर 'शोले' लावून सर्वजण एकासुरात त्याचे पाठ झालेले संवाद म्हणायचो ! अशातच एके दिवशी मित्राने त्याच्या हॉलिवूड फोल्डरमधला 'मेमेंटो' दाखवला ! पहिली रिएक्शन होती की 'हे काय चाललंय बे!' पण नंतर जाणवलं की असे काही out of the track बघायची सवय नव्हती ! ख्रिस्तोफर नोलान हे नावं पहिल्यादा ऐकलं ते त्या चित्रपटाच्या निमित्ताने ! पुढे नोलानच्या चित्रपटांनी मनावर एक गारुढच केलं ! इंटरस्टेलर ,इन्सेप्शन, अशा एकापेक्षा एक भन्नाट कलाकृती त्याने सादर केल्या, पण त्यामध्ये हॉलिवूडच्या परंपरेत बसणारा सवंगपणा, अश्लीलपणा अजिबात नव्हता ! कथा ह्या शक्यतो sci fi स्वरूपातल्या असल्या तरी विज्ञानाने आणलेले माणुसकीशून्य चित्रण त्यात नव्हते ! स्मृती, अंतर्मन, कृष्णविवर अशा अफलातून आणि मति गुंग करणाऱ्या कथा रंगवताना त्याने केलेले स्क्रिप्ट रायटिंग हे अभ्यासाचा विषय हो...