MPSC
#MPSC ६९ जागांसाठी २००००० अर्ज ! ही आकडेवारी खुप भयावह वाटणारी आहे. आज वृत्तपत्रात स्पर्धा परीक्षांचे भयानक वास्तव वाचले. शासकीय पदांच्या जाहिराती लवकर सुटत नाही, मग सुटल्याच तर दीर्घकाळ चालणारी भरती प्रक्रिया, परत कोणीतरी स्टे आणला की होणारी फरपट, न परवडणारी परीक्षा फी, काळासोबत बदलणारे पॅटर्न, उमेदीचा वाया जाणारा काळ, वाढणाऱ्या शिक्षणसंस्थांची स्पर्धा, स्टडी सर्कलच्या पुस्तकांची पारायणे, तरीपण धीर सुटत नाही कारण व्हाट्सअप-फेसबूकवर पाहिलेले नागरे पाटील- बानूगडे पाटील ह्यांची प्रेरक दिवास्वप्ने दाखवणारी भाषणे....!! हे भयाण चित्र आहे.