Posts

Showing posts from February, 2020

मृत्युंजय

Image
सहावीत असताना कधीतरी शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' कादंबरी वाचली होती. एखाद्या कथानायकाने किंवा कादंबरीने गारुढ करणे म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं. महारथी कर्ण हा त्या काळात माझ्यासाठी हिरो झाला होता खरंतर त्या वयातील आकलनशक्ती पाहता मृत्युंजय मधल्या वेगवेगळ्या नावांची सूचीच जास्त आवडली होती. बस्तीक, नाराच, सर्पमूख यासारखी बाणांची नावे किंवा सावंतांनी वापरलेली भाषा शैली मनाला खूप भावली होती. एखाद्या लेखकाला शस्त्र,राजे,वृक्ष यांची इतकी नावे कशी काय पाठ असु शकतात याचं कुतूहल वाटायचे. जस जसं वय वाढलं तस-तसा कर्ण आणखी जवळचा वाटू लागला. मरतेसमयी सोन्याचे दात देखील दान करणारा कर्ण, मैत्रीसाठी जीवन त्यागणारा कर्ण, एकटाच दिग्विजयाला निघणारा, कुमारी भूमीवर अंतिम संस्काराची कामना करणारा कर्ण, खूप आवडला होता. जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं त्यावेळेस आजूबाजूच्या घटनांमुळे कर्ण अधिक व्यापक वाटू लागला. परशुरामाने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला, द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या दिली नाही कारण का? तर तो ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय नव्हता ! कर्णाची गुणवत्ता नाका

नाझिया हसन - एक शोकांतिका

Image
अवघे ३५ वर्षांचे आयुष्य ! पण एवढ्या छोट्या काळातही ती संगीतविश्वावर विजेसारखी तळपली आणि अंतर्धान पावली. कलेला धर्म, प्रांत, जातीची बंधने नसतात हे वाक्य तस घासून गुळगुळीत झालेलं. पण हे ज्यांनी सार्थ करून दाखवल त्यातली एक गायिका म्हणजे 'नाझिया हसन' ! अगदी कमी वयात तिने पाकिस्तानच्या संगीतक्षेत्रात पदार्पण केले आणि पॉप संगीताची मुहूर्तमेढ रोवुन केवळ पाकिस्तानीच नव्हे तर आशियाई संगीतालाच कलाटणी द्यायला भाग पाडले. बेगम अख्तर, गुलाम अली, मेहंदी हसन या जातकुळीतल्या पाकिस्तानी संगीतासाठी ती एक सांस्कृतिक धक्का होती. ३०-४० वर्षांपूर्वीची पाकिस्तानी जनतेची मानसिकता लक्षात घेता तिच्या प्रागतिक संगीत प्रयोगाची कल्पना येईल. कारण तोवर पुढारलेला म्हणवल्या जाणाऱ्या भारतातही पॉप संगीताची पाळमूळ रुजलेली नव्हती. आपला भाऊ झोएब सोबत तिने एकापेक्षा एक सरस पॉप अल्बम दिले. दिलं बोले बुम बुम, डिस्को दिवाने, 'तेरी मेरी दोस्ती ही गाणी आजही नव्या पिढीला तोंडपाठ आहे. तिच्या अल्बमने विक्रीचा उच्चांक गाठला. मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. नाझिया उच्चविद्याव

असंतोषाच्या उंबरठ्यावर

'फेसबुक-व्हाट्सएप' एक झाले. 'आयडिया-वोडाफोन' एक झाले, 'झोमॅटो-उबेर इटस' एक झाले, या शतकाच्या सुरुवातीला दखलपात्र नसणाऱ्या किंवा अस्तित्वातच नसणाऱ्या या कंपन्यांनी अल्पावधीत मार्केटमध्ये स्वतःच नाव कमावलं. किंवा नाहीशा झाल्या. गेल्या वीस वर्षांत असे अनेक मर्जर-एक्विजिशन झाले आहेत. वरवर सर्वसाधारण वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मार्क झुकरबर्ग सारखा तरुण स्वतःची कंपनी सुरू करतो काय आणि पिढ्यानपिढ्या उद्योगात काढलेल्या लोकांना मागे टाकून श्रीमंत लोकांच्या यादीत नाव कमावतो काय हे सगळं विस्मयकारक आहे. केवळ टाटा-बिर्ला नाव ऐकायची सवय असलेल्या भारतीयांनी अंबानी-अदानी नावे घ्यायला कधी सुरुवात केली हेच कळले नाही. एकेकाळी मार्केटवर अधिराज्य गाजवणारे कोडॅक, BSNL, जनरल मोटर्स सारखे दिग्गज मागे पडुन त्या क्षितिजावर नविन नावे दिसु लागली आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट वैगेरे नावे माहीत नसलेली मंडळी आज दुकानात जाण्याचे कष्ट न घेता घरबसल्या ऑफर्स बघून ऑर्डर देत आहेत. इतके एप्स, वेबसाईट झाल्यानंतर सरकारी कार्यालयातुन मनुष्यबळ कमी करा म्हणुन ओरड होत आ