Posts

Showing posts from March, 2020

हे व्यर्थ न हो बलिदान

Image
पुलवामा आणि बालाकोटच्या घटनानंतर फेसबुकची वॉल रंगवणाऱ्या मित्रांनो या घटनेची तीव्रता देखिल तेवढीच महत्वाची समजुन दखल घ्या. पंजाबमध्ये अन्न व औषधे निरीक्षक पदावर काम करणाऱ्या नेहा शोरी ह्या प्रामाणिक महिला अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आज सर्व पंजाब ड्रग माफियांनी वेढला जात असुन देशाची भावी तरुणाई पोखरून काढण्याचे षडयंत्र भारताचे शेजारी राष्ट्र करत आहे. हे कोणत्याही हिंदी सिनेमातील दृश्य नाही. १९७१ साली भारताकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यावर पाकिस्तानला कळून चुकले की भारताला सरळ युद्धात हरवणे अवघड आहे, म्हणून त्यांनी युद्धाची वेगळी रणनीती आखली. पंजाब रेजिमेंट किंवा शीख समुदाय ही भारतीय सैन्याची ताकद आहे हे ओळखुन त्यांनी त्यावरच घाव घालण्याचे ठरवले. फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. पंजाबी युवकांची माथी भडकवली. पुढे भारताच्या प्रधानमंत्र्यांची व लष्करप्रमुखांची आहुती घेऊन धुमसणारा पंजाब काही काळ शांत झाला. आता ड्रग्सच्या माध्यमातून छुप्या युद्धाची तयारी त्यांनी चालवली आहे. नेहा शोरी सारख्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याने ड्रग्स विक्रेत्यांच्या

World Piano day

एकदा कुठेतरी वाचल होत की, जे संगीत ऐकून पाय हालतात (दाद देतात) ते पाश्चिमात्य संगीत असत आणि जे संगीत ऐकून डोक हलते (दाद देतात) ते भारतीय संगीत असत. ह्यातला देशप्रेमाचा भाग सोडला, तर संगीताला कोणतीही सीमारेषा नसते. 'पियानो' हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. १७ व्या, १८ व्या शतकात इटलीमध्ये कधीतरी बार्टलोमियो ख्रिस्तोफोरी नावाच्या कोण्या संगीतप्रेमीने तयार केलेले हे वाद्य आज त्याच्या देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरलं आहे. हिंदी सिनेमातली कित्येक अविट गाणी पियानोवर रचली गेली आहेत. पियानोवर गाणाऱ्या नायकाचा चेहरा आठवला की सर्वात प्रथम कपुर घराणे डोळ्यासमोर येत. 'दोस्त दोस्त ना रहा (राज कपुर), चले थे साथ मिलकर (शशी कपुर), दिलके झरोके मे तुझको बिठाकर (शम्मी कपुर), जीवन के दिन छोटे सही (ऋषी कपुर), ए दिल है मुश्किल (रणबीर कपुर)....!" काही कथानकात तर पियानो कथेचाच एक भाग वाटतो, 'मेरी जंग' मधला अनिल कपुर ज्या पियानोवर 'जिंदगी हर कदम एक नई जंग है' गातो तो पियानोच त्याच्या मुक्या आईची वाचा परत मिळवून देतो. अंधाधुंद मधला आयुषमान खुराणाचा तर सगळा रोलच पियानोवादकाचा.!!

शब्द जैसे कल्लोळ

#शब्द_जैसे_कल्लोळ भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट ! पंडित नेहरू आपल्या पहिल्या भाषणाची तयारी करत होते. त्यांच्या सचिवाने त्या भाषणाचा मसुदा त्यांच्यासमोर ठेवला. तो काळजीपुर्वक वाचल्यावर नेहरूंनी त्यातल्या 'Date with destiny'च्या जागी 'Tryst with destiny' हा बदल करायला सांगितले. कारण 'Date'चा एक अर्थ प्रेयसीसोबत भेटीच्या अर्थाने होतो. पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले भाषण असल्याने त्याचे ऐतिहासिक मोल नेहरूंना ठाऊक होते. देशाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा त्या भाषणातून दाखवायची 'जाण आणि भान' त्यांच्याकडे होत. आज पार्थ पवारांचं पहिलच भाषण नेटकऱ्यांमध्ये ट्रोलिंगचा विषय झालं. असाच अनुभव राहुल गांधींनी अर्णव गोस्वामीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आला होता. आता ह्यात दोष कोणाला द्यावा? कारण ही मंडळी ज्या पेज थ्री वर्तुळात वावरली आहे त्यांची सर्वसामान्य भारतीयाशी असलेली नाळ कधीच तुटलेली आहे. लहानपणापासून आजूबाजूला वावरणारे लोक एकतर राजघराण्यातले, उद्योगातले, किंवा सहकारसम्राट बिरुद असलेले ! कपिल सिब्बल, शशी थरूर, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्

रांगेतली ती

फार जुनी नाही अगदी अलीकडचीच गोष्ट. अलीकडची म्हणजे जेव्हा मोबाईल आणि माणुस दोघांना बटनांची गरज भासायची आणि दोघांतला फक्त मनुष्यप्राणीच स्मार्ट होता तेव्हाची ही गोष्ट ! त्यावेळी ऑनलाइन फॉर्म सबमिशनच फॅड फारस पसरल नव्हतं. अशाच कोणत्या तरी स्पर्धापरीक्षेच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारिख म्हणून मी धावतपळत पोस्ट ऑफिस गाठलं होत. पोस्टऑफिसच्या एकूणच वातावरणात आनंदीआनंद होता. भल्या मोठ्या रांगेच्या काऊंटर पलीकडच्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर ‘आजही आम्हाला भाव आहे’ असा गुर्मी वजा आनंद होता. ‘उशिरा फॉर्म भरणारे आपणच एकटे वेंधळे नाही,’ असा रांगेतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानी खजिलपणा दिसत होता. बाजुलाच एक समजुतदार वाटणारा नवरा आपल्या भोळ्या वाटणाऱ्या बायकोला ‘साक्षांकन आणि छायांकन’ मधला बेसिक फरक सांगत होता. दुसऱ्या बाजुला एकजण गांधीबाबाच स्टॅम्प तिकीट पाकिटाला लावताना फाळणीचा राग स्टॅम्पवर दणके देत काढत होता. ‘मोफतमे मिले तो जहरभी पिले’ या भारतीयांच्या सवयीला अनुसरून पलीकडच्या टेबलवरील डिंकाची बाटली टेबलवर सांडून सांडून एकरूप झाली होती. अशा आनंददायी वातावरणात मी माझ्या हातातली कागदांची चळत