Posts

Showing posts from April, 2020

शाळा

'कुसुमाग्रज' म्हणजे निर्विवाद भाषाप्रभु ! त्यांच्या ओजस्वी लेखणीतून कित्येक कविता लिहिल्या गेल्या. अवीट गीते रचली गेली. तशीच आमच्या शाळेची प्रार्थना पण त्यांनीच लिहिली होती. आमची प्राथमिक शाळा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शाळांपैकी एक होती. आजही शाळेचे ते विस्तीर्ण पटांगण आठवते. त्या प्रार्थनेला चाल कोणी दिली होती माहीत नाही पण खूप सुमधुर संगीत होत. एकेक कडव 'शाळा' आणि 'शिक्षणा'प्रति भक्तिभाव जागृत करेल असं होतं. शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांच्या रांगा एकासुरात हात जोडून प्रार्थना म्हणायचा हे खुप सुंदर दृश्य होत. आज शाळेची ती जुनी वास्तू जमीनदोस्त झाली आहे. शाळा नवीन जागी स्थलांतरित झाली आहे. प्रार्थना अद्याप तीच आहे की नाही माहीत नाही. डॉन बॉस्को, झेव्हीयर, न्यू एरा, फ्रावशी अशा नावांच्या गदारोळात ती प्रार्थना कुठेतरी हरवून गेली आहे. 'शाळेच स्टेट्स' डाऊन होऊ नये म्हणून पालकांकडे 4 व्हीलर असेल तरच प्रवेश द्यायचा, असे निकष असलेल्या काही नवीन शाळा निघाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा नाही म्हटलं तरी अखेरचा श्वास घेत आहेत. काही कॉन्व्हेंट शाळा मुल

MPSC 2

हवालदार पदाच्या ११३७ जागांसाठी २ लाख अर्ज ही बातमी वाचली. किती जणांनी गांभिर्याने अर्ज भरले सांगता येणार नाही पण यापैकी ४२३ (अभियंते) इंजिनियर होते. यामध्ये बेरोजगारीसाठी सरकारला दोष देऊन उपयोग नाही. मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला त्यावेळेस म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला नाशिकसारख्या शहरात फक्त २-३ इंजिनियरिंग कॉलेजेस होते. व थोडेफार तेवढेच तंत्रनिकेतन होते. पण गेल्या एक दीड दशकात दरवर्षी १-२ कॉलेजच्या वेगात वाढ होत आहेत. एक कॉलेज वाढणे म्हणजे त्या विद्याशाखेतील जवळपास ६० (Intake लक्षात घेता), स्पर्धक वाढतात. एवढ्या प्रमाणात इंजिनियर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतील तर त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या पण त्या प्रमाणात वाढली पाहिजे. पण दुर्दैवाने त्याकाळात जेवढी कंपन्यांची संख्या होती, तेवढीच आजही आहे. आणखी किती दिवस BOSCH-MAHINDRA-HAL ह्यांच्याकडून रोजगाराची अपेक्षा बाळगणार?? नवीन कंपन्या आल्या तरी त्यांना तेवढा ग्राहकवर्ग मिळेल का?? ही आकडेवारी खूप भयावह आहे.

रामायण-महाभारत

कालचे 'रामायण आणि महाभारत' ह्यांचे एपिसोड म्हणजे आयुष्यभर ध्यानी ठेवावे असे, धडे होते. #महाभारत - हस्तिनापूरच्या विभाजनानंतर आपल्या वाटेला ओसाड, वैराण भूमी आली म्हणुन पांडवांनी खचून न जाता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तिथे नविन शहर वसवले. कृष्णाने त्यांना समजावले की आता हिच तुमची 'कर्मभूमी' आहे. इंग्रजीत एक Quote आहे, 'There is a great value in disaster, we can start all over again' लाक्षागृह आग आणि हस्तिनापूरच्या फाळणीतुन पांडवांनी हाच बोध घेतला असावा. आता सगळं संपलं ही भावना जेव्हा आयुष्यात येते, तेव्हाच कदाचित आपल्या हातुन आणखी चांगलं किंवा भव्य घडण्याची शक्यता असते. हा आशावाद खुप महत्वाचा आहे. पंजाबी, सिंधी, पारशी हे समाज सातत्याने व्यापार उदिमात पुढे राहिले आहेत. वाळवंटी भागातले 'अरब व मारवाडी' देखिल व्यापारात दीर्घकाळ पुढे आहेत ह्याचे कारणही तेच आहे. स्वतःच्या मातृभूमीत येणारी सुखलोलुप जीवनशैली मनुष्याला निर्धास्त करत असते. Survival instinct नावाची त्याची भावना कमी करत असते, त्यामुळे स्वतःच्या चौकटीबाहेर गेल्यावर त्याला जगणे दुष्कर होऊन जाते

ताजमहल

Image
हिंदी सिनेमात दोन कलावंतांतील मतभेद, वाद-विवाद, शत्रुत्व ही नविन गोष्ट नाही. कधी 'व्ही.शांताराम-दादा कोंडके', कधी 'कुमार सानु-उदित नारायण,' कधी 'सलमान खान-विवेक ओबेरॉय'.... !! ह्यांच्या कथा मसाला लावुन सांगितल्या जातात. पण दोन गीतकारांमधील वैचारिक मतभेद त्यांच्या कलेतून कसे व्यक्त होतात ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे 'साहिर लुधियानवी' आणि 'शकील बदायुनी' ह्यांच्यातील ताजमहालावरील 'war of words'!! शकील बदायुनींचा जन्म उत्तरप्रदेशच्या एका धार्मिक कुटुंबात झाला होता. शायर म्हणून तिथे त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला होता. अलिगढ विद्यापीठात शिकत असतानाच उत्कृष्ट शायर म्हणुन त्यांनी प्रसिद्ध झाले होते. मुंबईत आल्यानंतर मुघल-ए-आझम, बैजु बावरा, दिदार, गंगा जमुना सारख्या सिनेमातून त्यांनी अनेक अजरामर गीते सिनेविश्वाला दिली. चौदहवी का चांद हो, हुस्नवाले तेरा जवाब नही, कही दीप जले...!! ह्या गीतांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले. दुसरीकडे साहिर लुधियानवी हे पंजाबच्या लुधियानाचे, मूळ नाव अब्दुल हायी..!! फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. वैयक्तिक

In Nolan we trust

Image
कॉलेजच्या दिवसात मित्रांची रूम म्हणजे आमच्यासाठी मिनी थिएटर होत ! ' शिंडलर्स लिस्ट' सारखा All time classic असो अथवा 'द अंग्रेज' सारखा छपरी हैद्राबादी सिनेमा, आमच्या रसिकतेला कशाचेही वावडं नव्हतं ! कधी कधी लॅपटॉपवर 'शोले' लावून सर्वजण एकासुरात त्याचे पाठ झालेले संवाद म्हणायचो ! अशातच एके दिवशी मित्राने त्याच्या हॉलिवूड फोल्डरमधला 'मेमेंटो' दाखवला ! पहिली रिएक्शन होती की 'हे काय चाललंय बे!' पण नंतर जाणवलं की असे काही out of the track बघायची सवय नव्हती ! ख्रिस्तोफर नोलान हे नावं पहिल्यादा ऐकलं ते त्या चित्रपटाच्या निमित्ताने ! पुढे नोलानच्या चित्रपटांनी मनावर एक गारुढच केलं ! इंटरस्टेलर ,इन्सेप्शन, अशा एकापेक्षा एक भन्नाट कलाकृती त्याने सादर केल्या, पण त्यामध्ये हॉलिवूडच्या परंपरेत बसणारा सवंगपणा, अश्लीलपणा अजिबात नव्हता ! कथा ह्या शक्यतो sci fi स्वरूपातल्या असल्या तरी विज्ञानाने आणलेले माणुसकीशून्य चित्रण त्यात नव्हते ! स्मृती, अंतर्मन, कृष्णविवर अशा अफलातून आणि मति गुंग करणाऱ्या कथा रंगवताना त्याने केलेले स्क्रिप्ट रायटिंग हे अभ्यासाचा विषय हो

ए.आर.रहमान

Image
आज वयाची पस्तिशी ओलांडणाऱ्या आणि रूढार्थाने तरुणाईचे दिवस मागे पडत चाललेल्या माझ्या पिढीवर तीन लोकांचा मोठा प्रभाव आजवर राहिला आहे. पहिला म्हणजे शिवाजी पार्कच्या गल्लीबोळात क्रिकेट खेळता खेळता जागतिक दर्जाचा खेळाडू झालेला एक मराठीच्या प्राध्यापकाचा मुलगा, दुसरा म्हणजे दिल्लीहून मुंबईला सिनेमात नशिब आजमावायला आलेला एक होतकरू अभिनेता ज्याला अभिनयाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, आणि तिसरा म्हणजे शाळा शिकायच्या वयात लहानपणी डोक्यावरून वाद्ये भाड्याने देण्यासाठी वाहुन नेणारा एक मद्रासी तरुण !! होय ! सचिन, शाहरुख, रहमान ह्या तिघांनी आम्हा 90's kids वर स्वतःची एक अमिट छाप सोडली आहे. ह्या तिघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कारकिर्दीचे शिखर गाठले तेव्हा तिघांचे वडिल ते पाहण्यास हयात नव्हते.( सचिनच्या वडिलांनी त्याला वर्ल्डकप उचलताना बघायला हव होत अस नेहमी वाटत.) ए.आर.रहमान...! 'मेरी जंग' सिनेमातल्या अनिल कपुरची वाटावी अशी ह्याच्या आयुष्याची चित्तरकथा ! मंदिरात भजन-प्रवचन करणाऱ्याचा नातू आणि गळक्या छपराच्या छोट्या घरात राहणाऱ्या वायरमनचा हा मुलगा, मूळ नाव दिलीप !! एवढीच त्याची

किशोरदाची जीवनगाणी

Image
सॉक्रेटिस, एरिस्टॉटल पासुन कार्ल मार्क्स, विवेकानंदांपर्यत ह्या जगात अनेक तत्ववेत्ते होऊन गेले. 'जिवन/जिंदगी/जीना...' याविषयांवर त्यांनी बरेच तत्वज्ञान जगाला ऐकवलं जे आजही शाळा,कॉलेजेसच्या भिंतीपासून फेसबुक वॉलपर्यंत वाचायला भेटते. पण ह्या साऱ्यांच्या पलिकडे असलेला एक गडी फार वेगळा होता, ज्याने आयुष्याचे सर्व धागे उलगडून दाखवले. 'शब्द' जरी त्याचे नव्हते तरी त्याच्या आवाजाने ती जीवनगाणी अजरामर होत गेली. तो अवलिया होता अर्थातच 'किशोरदा'!! एक गायक म्हणून त्याची कारकिर्द उशिरा सुरू झाली, पण तो जेवढं गायला ते पिढ्यानपिढ्या पुरून उरेल एवढं अनमोल संचित आहे. एका ठिकाणी तो गातो, ‘जिंदगीका सफर, है यह कैसा सफर कोई समझा नही” तर दुसरीकडे तोच स्वतःला समजावतो की “जिंदगीके सफरमे गुजर जाते है जो मुकाम, वो फिर नही आते!!!’ “एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नही” म्हणत तो ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाना’ हा राग आळवतो. तर दुसरीकडे “जिंदगी एक सफर है सुहाना” म्हणत हसत हसत जगायचा संदेश देतो. कधी आपल्या प्रेयसीला म्हणतो,”तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही”, तर तिलाच पुन्ह

अंडरटेकर

Image
आयुष्याच्या रहाटघाडग्यात काही माणसे अशी भेटतात कि त्यांचा आणि तुमचा काहीच संबंध नसतो पण त्यांचं डोळ्याआड जाणं तुम्हाला रुखरुख लावुन जात ! WWE CHAMPION अंडरटेकर हे नाव अशाच काही लोकांपैकी एक ! तुफान आदळआपट आणि हाणामारी असलेल्या ह्या खेळाबद्दल मला फारसं आकर्षण कधीच नव्हतं पण शालेय जीवनात इतर मित्रांमध्ये ह्याची क्रेझ होती म्हणून त्याची माहिती ठेवावी लागायची !! त्यातूनच अनेक नावे परिचित झाली होती, ट्रिपल एच, रॉक, योकोझुना, शॉन मायकल, केन असे एकापेक्षा एक धिप्पाड गडी ओळखीचे झाले. ह्या सर्वामध्ये अंडरटेकरबद्दल तर खूप कुतूहल होत. त्याची अंधारात होणारी एंट्री, चितपरिचित पार्श्वसंगीत, दिव्यांचा लखलखाट, आणि चाहत्यांचा जल्लोष हे सारं पाहुन आता बरीच वर्षे लोटली !! अंडरटेकर पुन्हा पुन्हा जन्म घेतो, त्याचाकडे स्पेशल पॉवर आहे, एका बाटलीत त्याचे प्राण आहे अशा भाकडकथावर विश्वास ठेवण्याच तेे दिवस होते. हे लोक खरच हाणामारी करतात की लुटुपुटीची असते हे शेवटपर्यत कळायचं नाही. कॉम्प्युटरच्या किंवा टीव्हीच्या व्हिडीओ गेममध्ये सुद्धा त्यांना घेऊन मारामारी करण्याची गंमतच न्यारी होती. पुढे महाविद्यालयात प