MPSC 2

हवालदार पदाच्या ११३७ जागांसाठी २ लाख अर्ज ही बातमी वाचली. किती जणांनी गांभिर्याने अर्ज भरले सांगता येणार नाही पण यापैकी ४२३ (अभियंते) इंजिनियर होते. यामध्ये बेरोजगारीसाठी सरकारला दोष देऊन उपयोग नाही. मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला त्यावेळेस म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला नाशिकसारख्या शहरात फक्त २-३ इंजिनियरिंग कॉलेजेस होते. व थोडेफार तेवढेच तंत्रनिकेतन होते. पण गेल्या एक दीड दशकात दरवर्षी १-२ कॉलेजच्या वेगात वाढ होत आहेत. एक कॉलेज वाढणे म्हणजे त्या विद्याशाखेतील जवळपास ६० (Intake लक्षात घेता), स्पर्धक वाढतात. एवढ्या प्रमाणात इंजिनियर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतील तर त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या पण त्या प्रमाणात वाढली पाहिजे. पण दुर्दैवाने त्याकाळात जेवढी कंपन्यांची संख्या होती, तेवढीच आजही आहे. आणखी किती दिवस BOSCH-MAHINDRA-HAL ह्यांच्याकडून रोजगाराची अपेक्षा बाळगणार?? नवीन कंपन्या आल्या तरी त्यांना तेवढा ग्राहकवर्ग मिळेल का?? ही आकडेवारी खूप भयावह आहे.

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

अदालत की कारवाई

धन्यवाद साहेब