शिवजंयती

"चौऱ्यांशी बंदरामाजी ऐसी जागा नाही" असे म्हणत छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग उभारण्याचा संकल्प सोडला होता. सिद्दी-पोर्तुगीजांना शह मिळावा म्हणून सागरी सीमा बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि कुरटे बेटावर सिंधुदुर्गाची जागा निश्चित केली. पण ह्या दुर्गाच्या भूमिपूजनासाठी स्थानिक पुरोहित तयार होईना. परकीय सत्ताधीश उरावर असताना शिवरायांची पाठ वळताच आपले काय होईल हि भीती होती. पण शिवरायांनी त्यांच्या मनातील हि भीती ओळखली त्यांना धीर देऊन आश्वस्त केले कि त्यांच्या जीविताला कोणाचं धोका राहणार नाही. मालवणचे जानभट व दादंभटअभ्यंकर हे दोन मामा-भाचे अखेरीस तयार झाले. पुढे खरॊखरच मालवणावर परचक्र चालून आले. तेव्हा स्वराज्याच्या शिलेदारांनी त्यांना सुखरूप स्थळी पोहोचवण्याची तयार दाखवली पण या दोघांनीही अशा संकटसमयी स्वराज्यापासून दूर जाण्यास नकार दिला. शिवरायांनी जलदुर्गहि बांधले आणि मनोदुर्गही !!! "मैदानसे भागनेवाले 'भाग' लेकर लढने लगे" हेच शिवरायांनी घडवलेल्या स्वराज्याच्या यशाचे गमक आहे. म्हणून मनोमन आठवावा जाणता राजा #शिवजंयती

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई